कुणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही.
कुणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही किंवा त्या व्यक्ती शिवाय आपण जगू शकत नाही आणि ती व्यक्ती आयुष्यात सोबत नसेल तर मरून जाईल, ह्या सारख्या मुर्खपणाच्या गोष्टी आपण एका प्रसंगी म्हणतो व करत असतो. पण एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुमचं सर्वस्व होऊ शकत नाही( श्वास, प्राण, हृदयाची धडधड वगैरे वगैरे) त्या फक्त म्हणायच्या गोष्टी किंवा सवयी असतात. कारण पाचवीला सटवी तुमच नशीब तिच्या हाताने लिहून तुमच जीवन-मृत्यू ठरवत असते. तर तुम्ही जीवाचा कितीही आटापिटा केला तरीही तुम्हाला तुमच विधिलिखित मरण येऊ पर्यंत जगावं लागेल.(सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका) मी जगू शकत नाही त्या व्यक्ती शिवाय हे रडगाणं कुणाकडे गात बसू नका, उगाचच हसू होईल. मोलाचं आयुष्य आहे आनंदाने जगा. काही सवयी त्रासदायक असतात पण सुटल्यावर मोक्ष प्राप्तीचा अनुभव देतात.©तारंग.
Comments
Post a Comment