मला सोडून नाही जाणार ना तु?
कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर करण नी पाठीवरची बॅग रागात फेकली आणि एखाद्या लहान मुला सारखा सोफ्यावर आडवा झाला. ते पाहून आई चिडली आणि करणला ओरडायला लागली पण करण नी ते दुर्लक्ष केल आणि निपचित पडून राहिला. खरंतर आज करणच्या चेहऱ्यावरील शांतता खूप काही सांगत होती. करणचे दिवसेंदिवस बदलत जाणारे हावभाव आईच्या चिंतेचे कारण बनत चालले आहे. आई : काय रे काय झालं आज? करण: काही नाही ( रागाच्या स्वरात) आई : काही नाही झालं मग बॅग का फेकली. करण : काही नाही झालं आणि मला वेड लागलंय म्हणून बॅग फेकली मी. बसं ह्या पुढे मला काही विचारू नको अस म्हणत करण नी आईच बोलणं टाळलं आणि रागारागात बाथरूम मध्ये गेला पण बाथरूम मध्ये गेल्यावर तो रडत स्वतःशीच बडबडायला लागला. यार करण काय चुकतं माझं, दरवेळेस जो येतो माझ्या भावनांशी खेळतो आणि निघून जातो, माझा कुणीच का विचार करत नाही. मी प्रत्येक नातं विश्वासाने आणि प्रेमाने जोडत आलोय पण सरते शेवटी का म्हणून माझ्या वाटेला इतका त्रास यावा? माझा चांगुलपणा ह्या साऱ्याला कारणीभूत आहे का? काय करू कळत नाहीये मला. हे देवा नको रे इतका अंत पाहून माझ्या सहनशीलतेचा, बसं झालं आता थांब...